Sunday, September 13, 2009
कृष्णमूर्ती यांच्या सहवासात
जे. कृष्णमूर्ती मानवी जीवनाचा जसा स्वतंत्र विचार करतात तसा शिक्षणाचाही. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी साधलेला संवाद शिक्षणाचा नवाच अर्थ सांगतो... ............. जे. कृष्णमूतीर् यांनी धर्माच्या रूढ संकल्पनेलीकडं जावून मानवजातीला उत्क्रांत करील अशा धर्मशील, प्रज्ञावंत मनाच्या निमिर्तीची प्रक्रिया जगासमोर मांडली. मात्र, ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून माहीत नसतात. त्यांच्या प्रेरणेने कृष्णमूतीर् फाऊंडेशनने जगभर ८ शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये विविध प्रयोग केले जातात. कृष्णमूतीर् शिक्षणाकडे जीवनाला नवी दृष्टी देणारे, जगण्याचे नवे आकलन शिकवणारे क्षेत्र म्हणून पाहतात. त्यांनी शिक्षक आणि विद्याथीर् यांच्याशी ज्या चर्चा केल्या, त्या चर्चांची पुस्तके प्रकाशित झाली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या दोन अनुवादित पुस्तकांमध्ये शिक्षक आणि विद्याथीर् प्रश्ान् विचारतात आणि कृष्णमूतीर् उत्तरे देतात. ही केवळ औपचारिक उत्तरे नाहीत तर कृष्णमूतीर् त्या प्रश्ानच्या मागील अज्ञानालाच आघाताचा विषय बनवून जीवनदृष्टी स्पष्ट करणारी उत्तरे देतात. त्यामुळे प्रश्ान् जरी नेहमीचे असले तरी उत्तरे वेगळी, जीवनभाष्य करणारी आहेत. स्वत:चे आकलन समजावून देणारी आणि अंतरंगाचा बहर उमजून सांगणारी आहेत. प्रश्ान् जरी विविधांगी असले तरी काही महत्त्वाच्या शीर्षकांमध्ये ती सर्व प्रश्ानेत्तरे बांधली आहेत. शिक्षणकार्य, स्वातंत्र्य, श्ावण, सृजनशील असंतोष, खुले मन, धामिर्कता, धर्मशील मन व विज्ञाननिष्ठ मन, ज्ञान आणि प्रज्ञा, स्वातंत्र्य व सुव्यवस्था, संवेदना, भीती, हिंसावृत्ती, मनातील पूर्वग्रह व प्रतिमा, वागणूक, योग्य शिक्षण, व्यापक दृष्टिकोन, कृती, स्पर्धा, भीती, शिकवणे आणि शिकणे, चांगले मन, नकारात्मक दृष्टिकोन, चिंतन आणि शिक्षण, बहरणे इत्यादी ५० पेक्षा जास्त विषयांवर कृष्णमूतीर् बोलतात. वाचक कृष्णमूतीर्ंच्या शिक्षणविषयक चिंतनात न्हाऊन जातो आणि खऱ्या अर्थाने बहरून जातो. ही तत्त्वज्ञानाची चर्चा असली तरी प्रश्न साधे, सोपे आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांचे प्रश्ान् अधिक नेमके व निरागस आहेत. 'आपल्याला प्रसिद्ध व्यक्ती का व्हावेसे वाटते?' 'आम्हाला खेळात जितकी मौज वाटते तितकी अभ्यासात का वाटत नाही?' 'आपण गरिबांचा द्वेष का करतो?' 'आम्ही खोडकर का असतो?' 'श्ाीमंत गविर्ष्ट का असतात?' 'मी पक्ष्यांच्या जवळ गेलो तर ते उडून का जातात?' 'मी धूम्रपान करतो तेव्हा शिक्षक माझ्यावर का चिडतात?' अशा प्रश्ानंना कृष्णमूतीर् अगदी सहज तात्त्विक डूब देतात. कृष्णजी म्हणतात की शिक्षण म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणे, पदवी मिळवणे, नोकरी पटकावणे व लग्न करणे एवढेच नव्हे तर पक्ष्यांचे कूजन ऐकणे, गगनाचे दर्शन घेणे, एखाद्या वृक्षाचे असाधारण सौंदर्य पाहणे, टेकड्यांच्या आकृत्या पाहणे व अंत:करणाने साथ देणे हे सारेच. ते विद्यार्थ्यांना सांगतात, 'शिक्षकांचे शिकवण्यावर खरेच प्रेम असेल तर तुम्ही अनन्यसाधारण व्यक्ती व्हाल. शिक्षक मनाने मुक्त असतो तेव्हा त्याच गोष्टींचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो. शिक्षण यशावर प्रेम करायला शिकवते पण आपण जे काही करतो, त्यावर प्रेम करायला शिकवत नाही, याबद्दल कृष्णजी नाराजी व्यक्त करतात. आज स्पर्धा हा प्रतिष्ठित शब्द झाला आहे. परीक्षांमुळे दरवषीर् किमान चार हजार विद्याथीर् आत्महत्या करतात. तरी आपण स्पर्धांना प्रतिष्ठा देतो. स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षेविषयी कृष्णमूतीर्ंची मांडणी अंतर्मुख करणारी आहे. महत्त्वाकांक्षी माणसाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान मिळतो. महत्त्वाकांक्षी, आक्रमक मनुष्य, विजीगिषू व प्रतिष्ठित समजला जातो. पण जेव्हा स्पर्धा नाहीशी होते तेव्हाच खरे शिक्षण अस्तित्वात येते. जो मनुष्य काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो, तो कुरूप असतो इतके थेटपणे कृष्णमूतीर् सुनावतात. शिक्षणातून समाजपरिवर्तन झाले पाहिजे असे बोलले जाते. पण परिवर्तन नेमके काय? कृष्णमूतीर्ंची परिवर्तनाची संकल्पनाच खूप वेगळी आहे. ते परिवर्तन आमूलाग्र आहे. प्रेम हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. प्रेमशून्य समाज म्हणजे वाळवंट. ज्याक्षणी जिव्हाळा निर्माण होतो त्याक्षणी जीवन सुंदर होते. तुम्ही खूप हुशार असाल, पण तुमच्या ठायी प्रेमभावना नसेल तर तुमचे सारे आयुष्य दु:खीकष्टी होईल. लहान वयात जर तुम्हाला प्रेमभावना नसेल, लोकांकडे, प्राण्यांकडे, फुलांकडे प्रेमळपणे तुम्ही बघत नसाल तर मोठे झाल्यावर जीवन पोकळ, रिकामे वाटेल. पण ज्या क्षणी प्रेम नावाची भावना जागेल तेव्हा जीवन बदलून जाईल. कृष्णमूतीर्ंचे सारे चिंतन थक्क करणारे आहे. साध्या, सरळ भाषेत ते महान तत्त्वज्ञान सांगतात. शिक्षणातून सत्याचा शोध घेण्याचे, स्वत:चा बोध घेण्याचे सार्मथ्य अंगी यावे, अशी त्यांची मांडणी आहे. तेव्हा शाळेकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. 'जगात घडते त्याची शाळा म्हणजे एक छोटी आवृत्ती आहे आणि सर्व विनाशकारी गोंधळ, दु:ख, हालअपेष्टा पाहून वाटते की नव्या मनाची निमिर्ती एवढाच त्यावर मार्ग आहे. ते केवळ योग्य प्रकारच्या शिक्षणानेच घडू शकेल. त्यासाठी शांतपणे बसून मनाचे कार्य बघणे हे वर्गात बसण्या इतकेच महत्त्वाचे आहे. ................. या गोष्टींचा विचार करा लेखक : जे. कृष्णमूर्ती अनुवाद: दिवाकर घैसास पाने: २६०, किंमत: १९५ रुपये
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment