- सुमन कल्याणपूर, नामवंत गायिका
सुमन म्हणजे फूल. सुमन कल्याणपूर या असामान्य गायिकेने गायलेली बहुतेक हिंदी-मराठी गाणी आजही तितकीच टवटवीत वाटतात. त्यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणे रसिकांच्या मनात तसेच ताजे आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच त्यांना 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर केला आहे. त्या निमित्ताने. ........... दिवाकर देशपांडे सुमन कल्याणपूर यांना हिंदी सिनेमांची खूप कमी गाणी गायला मिळाली याची त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना खंत आहे. खरं तर तशी खंत बाळगायचं काहीच कारण नाही. सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व सातत्याने गाणी गायली असली तरी त्यांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या व रसिकांच्या आजही लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण काढले तर समकालीन गायक-गायिकांपेक्षा सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. आकडेवारीतच बोलायचे झाले तर सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांच्या गाजलेल्या व लोकांच्या लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण २५ टक्के धरले तर सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही अधिक भरते. गाजलेल्या गाण्यांपेक्षा त्यांची न गाजलेली गाणी शोधणे अधिक अवघड आहे. त्यामुळे हिंदी पार्श्वगायन क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी गायिका कोण? या प्रश्ानचे एकमेव उत्तर सुमन कल्याणपूर असे आहे. याचा अर्थ लता मंगेशकर किंवा आशा भोसले या अयशस्वी गायिका आहेत, असा कुणी काढत असेल तर मात्र ते सपशेल चूक आहे. त्यांना यश आणि अपयशाची मोजपट्टीच लावता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गायिकांना वगळून हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायकांच्या कारकिदीर्चा आढावा घ्यायचा असेल तर सुमन कल्याणपूर या एकमेव यशस्वी गायिका ठरतात! खरं तर सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्याच जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे हिंदी, मराठीतले लता मंगेशकरांचा आवाज वापरणारे बरेच संगीतकार काही विशिष्ट गाणी सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'हाले दिल उनको सुनाना था' हे 'फरियाद'मधलं ज्येष्ठ संगीतकार (कै.) स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं गाणं फक्त सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात फिट बसतं. तसंच 'मेरे महबूब न जा, आजकी रात न जा' हे 'नूरमहल'मधलं जानी बाबू कव्वाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं इतर कोणत्याही आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या आवाजातलं, गायकीतलं खास असं वेगळेपण अशा अनेक गाण्यांमधून रसिकांना दिसत राहतं. लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती, तसं सुमन कल्याणपूर यांच्याबाबत नव्हतं, कारण त्यांचा आवाज ही संगीतकारांची कमजोरी होती. अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते या अटळतेला बाजूला ठेवून सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चचेर् हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं तसं 'चालू टाईप'चं गाणं. ते लता मंगेशकरांनी गायलं असतं तर नक्कीच लोकप्रिय झालं असतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. अशा गाण्यांची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला असे बरेच लोक म्हणतात खरे; पण कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. जे काही मिळालं ते निखळ होतं आणि या अव्वल गायिकेनं त्या गाण्यांचं सोनंच केलं. शेकडो गाणी गात राहून अनेकांमधला एक कलाकार होण्यापेक्षा मोजकी पण नेमकी लक्षात राहणारी गाणी गाऊन त्यांनी स्वत:चं हिंदी, मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी गायलेल्या इतर भाषांमधल्या गाण्यांमुळे त्यांचं त्या त्या प्रादेशिक भाषांमध्येही असंच स्थान असणार, यात शंका नाही. सुमन कल्याणपूर यांचीही भावना आपल्यावर अन्याय झाला, आपण हिंदी संगीत क्षेत्राच्या राजकारणाचे बळी आहोत, अशी असल्याचे काही ठिकाणी वाचायला मिळते. ते कितपत खरे आहे माहीत नाही. पण 'सुमन कल्याणपूर' या नावाने भारतातील पार्श्वगायनाच्या इतिहासात एक न पुसले जाणारे प्रकरण ठळकपणे लिहिले गेले आहे आणि जोपर्यंत हिंदी, मराठी गाणी ऐकणारे रसिक या भूतलावर आहेत, तोपर्यंत हे नाव आणि त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर राहणारच आहेत.
Monday, January 18, 2010
Sunday, December 20, 2009
टीव्हीची दुनिया
दशकभरात भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने भरपूर मोठी झेप घेतली आहे. चॅनल्सच्या या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती होऊ लागली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. आज चॅनल जगताने बरीच मोठी झेप घेतली आहे. १९९३ मध्ये फक्त दहा चॅनल्स होते. आज या चॅनल्सची संख्या २२० च्या वर पोहोचली आहे. भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने गेल्या दशकभरात प्रचंड झेप घेतली आहे. एण्टरटेन्मेण्ट, न्यूज ते स्पोर्ट्स, बिझनेस संबंधित चॅनल्सचा सुळसुळाट झाला आहे. चॅनल्सची संख्या वाढली तशी त्यावरील कार्यक्रमांची संख्या वाढली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणीही भरपूर प्रमाणात वाढली. म्हणूनच आज या क्षेत्रात फूल टाइम करिअर करता येणं शक्य आहे. मीडिया इण्डस्ट्रीत आलेल्या बुममुळे वेगवेगळे चॅनल्सना चांगले दिवस आले आहेत. यामुळे टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्रातही कामाच्या संधी खूप वाढू लागल्या आहेत. टीव्ही प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिका, व्हिडीओ प्रोडक्शन, डिजिटल व्हिडीओ आणि लाइटिंग, एडिटिंग या सगळ्यांचा समावेश होतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतल्यावर टीव्ही प्रोडक्शन प्रोसेस, फिल्म अॅण्ड व्हिडीओ डिजिटल एडिटिंग, यूज ऑफ डिजिटल कॅमेरा, फिल्म अॅण्ड टीव्ही ग्राफिक्स, लाइट डिझाइन टेक्निक्स, मीडिया प्लॅनिंग, पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स आदी क्षेत्रांत काम करता येतं. टीव्ही प्रोडक्शनचं प्रशिक्षण घेतल्यावर स्वतंत्र प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता येतं. एखाद्या टीव्ही प्रोड्युसरकडे पर्सनल असिस्टण्ट म्हणून काम करण्याचा पर्यायही आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या टीव्ही प्रोड्युसरला त्या कार्यक्रमातील कलाकारांच्या येण्याजाण्यापासून कॉश्च्युम, एडिटिंग, शूटिंग, प्रॉपटीर्, बजेट प्लॅनिंग अशा सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. दूरदर्शन, झी, सोनी, एनडीटीव्ही, स्टार, ई टीव्ही अशा अनेक चॅनल्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ऑन लाइन प्रोड्युसर, प्रोडक्शन डिझायनर अशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या चॅनल्सवरील संस्कृती, डान्स, कला, मनोरंजनात्मक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती करण्यासाठी प्रत्येक चॅनलला टीव्ही प्रोड्युसरची गरज असते. या क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच टेक्निकल बाजूची माहिती असणाऱ्या प्रोफेशनल्सना बालाजी टीव्ही हाउससारख्या विविध प्रोडक्शन हाउसेसमध्ये असिस्टण्ट एडिटर, असिस्टण्ट साऊण्ड रेकॉडिर्स्ट, असिस्टण्ट कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. बीबीसी, सीएनबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जीओग्राफीसारख्या इण्टरनॅशनल चॅनल्समध्येही नोकरीसाठी अर्ज करता येईल. फ्रेशर म्हणून कमीतकमी पाच हजार रुपये पगार तर हमखास मिळतो. तर अनुभवी व्यक्तींना २० हजार आणि त्याहून अधिक पगार मिळतो. काही संस्थांमध्ये या क्षेत्राचं परिपूर्ण प्रशिक्षण देणारे स्पेशलाइज्ड् कोसेर्स उपलब्ध आहेत (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे). इथे तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उपलब्ध आहे. तसंच एक वर्षाचा सटिर्फिकेट कोर्सही आहे. तर काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशन कोर्सच्या सिलॅबसमध्ये टीव्ही प्रोडक्शन हा एक भाग असतो. या कोर्समधून विद्यार्थ्यांना कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा विविध विषयांशी ओळख करून घेता येतेत. एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, दिल्ली इथे दोन वर्षांचा एमए हा डिग्री कोर्स आहे. तर दिल्लीच्याच इंदप्रस्थ कॉलेजमध्ये बॅचलर मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन कोर्सचा एक भाग म्हणून या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येतं. दिल्लीच्याच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने त्यांच्या पीजी डिप्लोमा इन रेडिओ अॅण्ड टीव्ही जर्नलिझम कोर्सचा एक भाग म्हणून नुकताच टीव्ही प्रोडक्शन हा विषय सुरू केला. काही प्रायव्हेट संस्थांमध्ये शॉर्ट टर्म प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. काही संस्थांतफेर् या विषयाची ओळख करून देणारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्सही घेतले जातात. स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग इथेही डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग, डिग्री इन फिल्म मेकिंग, सटिर्फिकेट कोर्स इन टेलिव्हिजन प्रोडक्शन हे कोसेर्स उपलब्ध आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेणं तितकंसं सोपं नसतं. संस्थांची मर्यादित संख्या आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे इथली प्रवेश प्रक्रिया थोडी कठीण असते. यासाठी प्रथम लेखी परीक्षा पास व्हावं लागतं. ........ हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही नामांकित संस्था : झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेण्ट झेविअर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मुंबई ०१सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, नवी दिल्ली मैसूर युनिव्हसिर्टी, मैसूर सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग, अंधेरी/चेन्नई/नवी दिल्ली/बंगलोर.
Sunday, December 13, 2009
अखेरची कविता!
अखेरची कविता!:
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचा उद्या स्मृतिदिन. १४ डिसेंबर, १९७७ रोजी 'आधुनिक वाल्मिकी' असा गौरव झालेल्या गद
िमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरत्कुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे 'कळशीच्या तीर्थावर' हे पुस्तक लिहिले आहे. 'ब्लू बर्ड'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.
रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ''हॅलो...!''
दुसरीकडून आवाज आला, ''हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय.''
''बोला बोला! काय खबरबात?''
''तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही.''
''आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत?''
''गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, 'कविश्रींचे पाय अजून 'आनंदवना'ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा.' तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक 'आनंदमेळावा' योजला आहे.''
''त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला''
''बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. 'आनंदमेळ्या'साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय?''
''पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण.''
''उदईक सेवकास धाडतो लेखनाचा कागुद आणण्यासाठी.''
संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून 'बालतरूची पालखी' काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्.ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :
'कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येऊनिया।
माणसाची प्रीती घेई रे संगाती
मानाचा अतिथी आमुचा तू।
श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात
येइ या घरात आनंदाने।
आनंदाचा नाद मंजुळ संगीत
शाखापल्लवात घेऊनी ये।
कोवळ्या पानात तुझिया नवीन
सूर्याचे किरण नाचू देत।
वनाचा वल्लभ नाचताहे वारा
देई उपहारा गीताचा त्यां।
वर्षतो श्रावण आशिर्वाद त्याचा
मुकुट माथीचा होवो तुज।
इंदपुरीतून धारा वर्षताती
पडू दे त्या माथीं पानांवर।।'
पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्.ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी...
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचा उद्या स्मृतिदिन. १४ डिसेंबर, १९७७ रोजी 'आधुनिक वाल्मिकी' असा गौरव झालेल्या गद
िमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरत्कुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे 'कळशीच्या तीर्थावर' हे पुस्तक लिहिले आहे. 'ब्लू बर्ड'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.
रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ''हॅलो...!''
दुसरीकडून आवाज आला, ''हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय.''
''बोला बोला! काय खबरबात?''
''तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही.''
''आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत?''
''गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, 'कविश्रींचे पाय अजून 'आनंदवना'ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा.' तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक 'आनंदमेळावा' योजला आहे.''
''त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला''
''बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. 'आनंदमेळ्या'साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय?''
''पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण.''
''उदईक सेवकास धाडतो लेखनाचा कागुद आणण्यासाठी.''
संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून 'बालतरूची पालखी' काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्.ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :
'कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येऊनिया।
माणसाची प्रीती घेई रे संगाती
मानाचा अतिथी आमुचा तू।
श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात
येइ या घरात आनंदाने।
आनंदाचा नाद मंजुळ संगीत
शाखापल्लवात घेऊनी ये।
कोवळ्या पानात तुझिया नवीन
सूर्याचे किरण नाचू देत।
वनाचा वल्लभ नाचताहे वारा
देई उपहारा गीताचा त्यां।
वर्षतो श्रावण आशिर्वाद त्याचा
मुकुट माथीचा होवो तुज।
इंदपुरीतून धारा वर्षताती
पडू दे त्या माथीं पानांवर।।'
पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्.ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी...
Sunday, November 1, 2009
लोकांचा लेखक
मराठी साहित्यविश्वातला छुपा चातुर्र्वण्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना बाबा कदम हा अस्सल कथा लिहिणारा लेखक मान्यते
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध
लोकांचा लेखक
मराठी साहित्यविश्वातला छुपा चातुर्र्वण्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना बाबा कदम हा अस्सल कथा लिहिणारा लेखक मान्यते
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध.
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध.
Sunday, October 25, 2009
तमाशा फडातला वगसम्राट
चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले.चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशा क्षेत्रातील अनुभवी आणि बुजुर्ग नाव होते. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने गेली पन्नास वर्षे तमाशा फड गाजविला. आपल्या करारी भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी तमाशातल्या वगाला कलात्मक दर्जा मिळवून दिला. चंद्रकांत भाऊंनी साकारलेला "अब्जलखान' अजूनही यापुढे कितीतरी काळ तमाशा रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही. वगात खलनायकाची भूमिका करावी ती चंद्रकांत ढवळपुरीकरांनीच. सत्तर ते नव्वद या दशकात एकीकडे विठाबाई, कांताबाई आणि रोशनबाई यांच्या लावणीच्या दिलखेच अदांवर आणि त्यांच्या नशिल्या जवानीवर उभा महाराष्ट्र घायाळ होत होता, अशा काळात चंद्रकांत ढवळपुरीकर या तमासगिराने आपल्या दमदार अभिनयाने तमाशाच्या प्रेषकाला वगाची गोडी लावली. पारंपरिक तमाशाला आधुनिक चेहरा देऊन त्यातील नाट्य अधिक प्रगल्भ केले.अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावात १९३२ मध्ये या कलावंताचा जन्म झाला. १९५० ते २००० ही ५० वर्षे त्यांनी तमाशा कलेतून समाजप्रबोधन केले. सुरवातीला विष्णू बुवा बांगर यांच्या तमाशात ढवळपुरीकरांनी नाच्याची भूमिका करून आपल्या तमाशा सेवेची नांदी उभी केली. १९५० नंतर तुकाराम खेडकर यांच्याबरोबरीने काम करत ढवळपुरीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. पुढे १९६४ नंतर त्यांनी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या साथीने तमाशा फड काढला आणि यानंतर मात्र हा बहुआयामी तमासगीर स्वतंत्रपणे आपला तमाशा फड घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकरंजनासाठी फिरत राहिला.तमाशात नाच्या, सोंगाड्या, अभिनय सम्राट, मॅनेजर व तमाशाचा मालक अशा कितीतरी जबाबदाऱ्या झेलत झेलत ढवळपुरीकर लोककलेचा पारंपरिक व कलात्मक बाज तसाच ठेवून तमाशाला प्रबोधनाच्या वाटेवर आणू पाहत होते. ढवळपुरीकरांचा तमाशा का पहायचा? तर तो त्यांच्या वगामुळे, असे आजही बोलले जाते. "संत तुकाराम', "भक्त पुंडलिक', "चित्ता फाडला जावळीचा', "महाराष्ट्र झुकत नाही' हे चंद्रकांत ढवळपुरीकरांचे खास गाजलेले वग होते. या वगांतील गणोजी शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी, आबाजी पाटील या व्यक्तिरेखांतून त्यांनी तमाशाशौकिनांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा "महाराष्ट्र झुकत नाही' हा वग तर इराण, जर्मनी आणि अमेरिकेतील लोककलांच्या अभ्यासकांचा अभ्यासविषय बनला. तमाशा क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी आणि मान-सन्मान लाभलेला हा हाडाचा कलावंत होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कला पुरस्कार देऊन गौरविलेच, पण मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणचे अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांना मिळाले. प्रवरानगर येथील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पद्मश्री विखे पाटील पुरस्कारानेही हा कलावंत सन्मानित झाला. असे मानसन्मान आणि पुरस्कार मिळूनही त्यांची नजर तमाशाच्या फडाबाहेर गेली नाही. नाटक, चित्रपटाच्या आमिषाला न भुलता ते लोकनाट्याला नवा बाज देण्यात रममाण झाले.चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले. तमाशाच्या अनेक देशी-परदेशी अभ्यासकांचे भाऊ केंद्र होते. तमाशाचे सारे रस्ते याच आधारवडावर येऊन थांबत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत व संयमी होते. शुद्ध वाणी, वाणीतला स्पष्ट आणि ओजस्वी भाव भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकावर मोहिनी टाकायचा. व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती होती; पण तमाशात मात्र भाऊंनी खलनायकी पात्रांना साकारले. या अर्थाने भाऊंच्या समोर निळू फुले यांचा आदर्श होता. तमाशाबद्दल बोलताना ते आवर्जून अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख करत. अण्णा भाऊंना अपेक्षित असलेले लोकनाट्य अजूनही का साकारत नाही, ही त्यांची खंत होती.तमाशात रात्रीचा राजा दिवसा मात्र भिकारी असतो. महाराष्ट्रातल्या साऱ्याच लोककलांची ही शोकांतिका आहे. चंद्रकांत भाऊ याला अपवाद नव्हते. अत्यंत शिस्तबद्धपणे तमाशा चालवूनही तमाशाचा मालक कर्जाच्या खाईत ढकलला जातोच. याला कारण तमाशा कॅन्सरसारखी शिरलेली सावकारशाही आणि शासनाची उदासीनता आहे, असे ते सातत्याने सांगत.आजचा तमाशा बदलला, त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. नाटक आणि चित्रपटाचे तो अतिरेकी अनुकरण करायला लागला, तमाशाच्या प्रेक्षक बदलला, त्यांची अभिरुची बदलली, कला म्हणून तमाशा किती उरला आणि व्यवसाय म्हणून तो नेमका कुठे चालला आहे, असे प्रश्न तमाशासमोर आहेतच, याशिवाय तमासगिरांचे दारिद्य्र, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असे असंख्य प्रश्न तमाशा कलेसमोर उभे असताना तमाशा क्षेत्रातला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यासारखा मार्गदर्शक फड सोडून जावा, ही तमाशा कलेच्या दृष्टीने अत्यंत शोकात्म घटना आहे.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार, हे वास्तव आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर या आधुनिक व आर्थिक बदलांचा निश्चितपणे परिणाम होत आहे. आज जगभरातल्या लोककला संपुष्टात येऊ पाहत असताना तमाशाकडून पारंपरिक अपेक्षा करून चालणार नाही, हेही वास्तव आहे; पण महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला कला म्हणून संपत चालली आणि व्यवसाय म्हणून अधिकाधिक शृंगारिक बनली, याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणमीमांसा करण्याची ही निश्चित वेळ आहे. एकीकडे लोकसाहित्य व लोककलांच्या अभ्यासात तमाशाचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला नाही आणि जो झाला तो विद्यापीठांच्या एम.फिल. व पीएच.डी. या पदव्यांपर्यंत मर्यादित राहिला. दुसरीकडे शासनाने व सांस्कृतिक कलांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी तमाशा कलेचा विकास होईल, तमाशा कलावंतांना सामाजिक न्याय मिळेल, अशी धोरणात्मक अंमलबजावणी कधीच केली नाही आणि तिसरीकडे शिक्षण, व्यसन, दारिद्य्र आणि नैतिक शिस्तीच्या अभावी तमासगीर केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत राहिला. तमाशातील जातिव्यवस्था पाहिली तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. ""महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं आणि ब्राह्मणाघरी लिव्हनं'' हे म्हणणे तमाशाला तंतोतंत लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला ब्रोकन मॅन (पाठीचा कणा मोडलेला माणूस) तमाशा कलेत पावलोपावली दिसतो आहे. या ब्रोकन मॅनचा विचार झाला नाही तर दिवसागणिक लावण्यांचे शृंगारिक नाद सजतील, कला केंद्र उत्तररात्री फुलतील, डान्स बार पुन्हा उघडतील आणि चंद्रकांत ढवळपुरीकरांसारखे तमाशातले असंख्य कलावंत दारिद्य्र व लाचारीचे जिणे जगत जगत जगाचा निरोप घेतील, ही पुरोगामी महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला पाटील बाई नाचवणे हे प्रतिष्ठेचे मानत राहील, तोपर्यंत तमाशा ही कला केवळ शृंगाराचा अड्डाच राहील, हे वेगळे सांगायला नको. चंद्रकांत ढवळपुरीकर हा कलावंत या साऱ्या गोष्टींच्या विरोधी होता. "कला म्हणून तमाशाला जपा,' हा ढवळपुरीकरांनी नव्या तमाशा कलावंतांना दिलेला संदेश आज शासनाने, तमाशाच्या अभ्यासकांनी, कलावंतांनी, प्रेक्षकांनी आणि तमाशाचा विकास करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतला, तर या "वगसम्राटा'ला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
Friday, October 23, 2009
राज्यातील विजयी उमेदवार 10/2009
नंदूरबार - १ - अक्कलकुवा (अनुसूचित जमाती) - ऍड. के. सी. पाडवी (कॉंग्रेस)२ - शहादा (अनुसूचित जमाती) - पद्माकर वळवी (कॉंग्रेस) ३ - नंदूरबार (अनुसूचित जमाती) - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)४ - नवापूर (अनुसूचित जमाती) - शरद गावीत (समाजवादी पक्ष)धुळे - ५ - साक्री (अनुसूचित जमाती) - योगेंद्र भोये (कॉंग्रेस)६ - धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील (शिवसेना)७ - धुळे शहर - अनिल गोटे (लोकसंग्राम)८ - सिंदखेडा - जयकुमारभाऊ रावळ (भाजप)९ - शिरपूर (अनुसूचित जमाती) - काशिनाथ पावरा (कॉंग्रेस)जळगाव -१० - चोपडा (अनुसूचित जमाती) - जगदीशचंद्र वाळवी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११ - रावेर - शिरीष चौधरी (अपक्ष)१२ - भुसावळ (अनुसूचित जाती) - संजय सावकारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१३ - जळगाव शहर - सुरेशकुमार जैन (शिवसेना)१४ - जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १५ - अमळनेर - कृषिभूषण पाटील (अपक्ष)१६ - एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना)१७ - चाळीसगाव - राजीव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८ - पाचोरा - दिलीप वाघ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९ - जामनेर - गिरीश महाजन (भाजप)२० - मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)बुलडाणा - २१ - मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)२२ - बुलडाणा - विजयराज शिंदे (शिवसेना)२३ - चिखली - राहुल बोंद्रे (कॉंग्रेस)२४ - सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५ - मेहकर (अनुसुचित जाती) - संजय राजमूलकर (शिवसेना)२६ - खामगाव - गोकुळचंद सानंदा (कॉंग्रेस)२७ - जळगाव (जमोद) - डॉ. संजय कुटे (भाजप)अकोला -२८ - अकोट - संजय गवांडे (शिवसेना)२९ - बालापूर - बळीराम शिरसकर (अपक्ष)३० - अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)३१ - अकोला पूर्व - हरिदास भाडे (भारीप बहुजन महासंघ)३२ - मूर्तिजापूर - हरिश पिंपळे (भाजप)वाशिम - ३३ - रिसोड - सुभाषराव झनक (कॉंग्रेस)३४ - वाशिम (अनुसूचित जाती) - लखन मलीक (भाजप)३५ - कारंजा - प्रशांत डहाके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)अमरावती -३६ - धामणगाव - वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस)३७ - बडनेरा - रवी राणा (अपक्ष)३८ - अमरावती - रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)३९ - तिवसा - ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) ४० - दर्यापूर (अनुसूचित जाती) - अभिजीत अडसूळ (शिवसेना)४१ - मेळघाट - केवळराम काळे (कॉंग्रेस)४२ - अचलपूर - ओमप्रकाश कडू (अपक्ष)४३ - मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (अपक्ष)वर्धा -४४ - अर्वी - दादाराव केचे (भाजप)४५ - देवळी - रणजित कांबळे (कॉंग्रेस)४६ - हिंगणघाट - अशोक शिंदे (शिवसेना)४७ - वर्धा - सुरेश देशमुख (अपक्ष)नागपूर -४८ - काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ४९ - सावनेर - सुनील केदार (कॉंग्रेस)५० - हिंगणा - विजयभाऊ घोडमारे (भाजप)५१ - उमरखेड (अनुसूचित जाती) - विजय खडसे (कॉंग्रेस)५२ - नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)५३ - नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे (कॉंग्रेस)५४ - नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)५५ - नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)५६ - नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख (भाजप)५७ - नागपूर उत्तर (अनुसूचित जाती) - डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)५८ - कांपटी - चंद्रशेखर बावनकुले (भाजप) ५९ - रामटेक - आशिष जैस्वाल (शिवसेना)भंडारा -६० - तुमसर - अनिल बावणकर (कॉंग्रेस)६१ - भंडारा - नरेंद्र भोंडेकर (कॉंग्रेस)६२ - साकोली -नानाभाऊ पाटोले (भाजप)गोंदिया - ६३ - अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोळे (भाजप)६४ - तिरोरा - कुशाल बोपाचे (भाजप)६५ - गोंदिया - गोपालदास अगरवाल (कॉंग्रेस)६६ - आमगाव (अनुसूचित जमाती) - रामरतनबापू राऊत (कॉंग्रेस)गडचिरोली -६७ - आरमोरी (अनुसूचित जमाती) - आनंदराव गेडाम (कॉंग्रेस)६८ - गडचिरोली (अनुसूचित जमाती) - डॉ. डल्लुजी नामदेव (कॉंग्रेस)६९ - अहेरी (अनुसूचित जमाती) - दिपक अत्राम (अपक्ष)चंद्रपूर -७० - राजूरा - सुभाष धोटे (कॉंग्रेस)७१ - चंद्रपूर (अनुसूचित जाती) - नानाजी शामकुळे (भाजप)७२ - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप)७३ - ब्रह्मपूरी - अतूल देशकर (भाजप) ७४ - चिमुर - विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस)७५ - वरोरा - संजय देवतळे (कॉंग्रेस)यवतमाळ -७६ - वणी - वामनराव कासावकर (कॉंग्रेस)७७ - राळेगाव (अनुसूचित जाती) - प्रा. वसंत पुरके (कॉंग्रेस)७८ - यवतमाळ - निलेश पावरेकर (कॉंग्रेस)७९ - दिग्रस - संजय राठोड (शिवसेना) ८० - अरणी - शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)८१ - पुसाद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८२ - उमरखेड - विजयराव खडसे (कॉंग्रेस)नांदेड -८३ - किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ८४ - हडगाव - माधवराव पवार (कॉंग्रेस)८५ - भोकर - अशोक चव्हाण (कॉंग्रेस)८६ - नांदेड उत्तर - डी. पी. सावंत (कॉंग्रेस)८७ - नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोखरणा (कॉंग्रेस)८८ - लोहा - शंकर धोंडगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८९ - नायगाव - वसंतराव चव्हाण (अपक्ष)९० - देगलूर (अनुसूचित जाती) - रावसाहेब अंतापूरकर (कॉंग्रेस)९१ - मुखेड - हनुमंत पाटील (कॉंग्रेस)हिंगोली -९२ - वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)९३ - कळमनुरी - राजीव सातव (कॉंग्रेस)९४ - हिंगोली - भाऊराव पाटील गोरेगावकर (कॉंग्रेस)परभणी -९५ - जिंतूर - रामप्रसाद कदम (कॉंग्रेस)९६ - परभणी - संजय जाधव (शिवसेना)९७ - गंगाखेड - सीताराम घनदाट (अपक्ष)९८ - पाथरी - मीरा रेंगे (शिवसेना)जालना - ९९ - परतूर - सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)१०० - घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०१ - जालना - कैलास गोरंट्याल (कॉंग्रेस)१०२ - बदनापूर (अनुसूचित जाती) - संतोष सांबरे (शिवसेना)१०३ - भोकरदन - चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०४ - सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नाबी (कॉंग्रेस)औरंगाबाद - १०५ - कन्नड - हर्षवर्धन जाधव (मनसे)१०६ - फुलंब्री - डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)१०७ - औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (अपक्ष)१०८ - औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती) - संजय शिरसाट (शिवसेना)१०९ - औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा (कॉंग्रेस) ११० - पैठण - संजय वाघचौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१११ - गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)११२ - वैजापूर - आर. एम. वाणी (शिवसेना)नाशिक - ११३ - नांदगाव - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११४ - मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद ईस्माइल ए. खलीक (जनसुराज्य शक्ती) ११५ - मालेगाव बाह्य - दादा भौसे (शिवसेना)११६ - बागलान (अनुसूचित जमाती) - उमाजी बोरसे (भाजप)११७ - कळवण - अर्जुन पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११८ - चांदवड - शिरीष कोतवाल (अपक्ष)११९ - येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१२० - सिन्नर - माणिकराव कोकाटे (कॉंग्रेस)१२१ - निफाड - अनिल कदम (शिवसेना)१२२ - दिंडोरी (अनुसूचित जमाती) - धनराज महाले (शिवसेना)१२३ - नाशिक पूर्व - ऍड. उत्तमराव ढेकले (मनसे) १२४ - नाशिक मध्य - वसंतराव गीते (मनसे)१२५ - नाशिक पश्चिम - नितीन भोसले (मनसे)१२६ - देवळाली (अनुसूचित जाती) - बबनराव घोलप (शिवसेना)१२७ - इगतपूरी (अनुसूचित जाती) - निर्मला गावीत (कॉंग्रेस)ठाणे -१२८ - डहाणू (अनुसूचित जाती) - राजाराम ओझारे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)१२९ - विक्रमगड (अनुसूचित जाती) - ऍड. चिंतामणराव वांगा (भाजप)१३० - पालघर (अनुसूचित जमाती) - राजेंद्र गावीत (कॉंग्रेस)१३१ - बोईसर - विलास तारे (बहुजन विकास आघाडी)१३२ - नालासोपारा - क्षितीजी ठाकूर (बहुजन विकास आघाडी)१३३ - वसई - विवेक पंडीत (अपक्ष)१३४ - भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) - विष्णु सावरा (भाजप)१३५ - शहापूर (अनुसूचित जमाती) - दौलत दरोडा (शिवसेना) १३६ - भिवंडी पश्चिम - अब्दुल रशिद ताहीर मोमीन (समाजवादी पक्ष)१३७ - भिवंडी पूर्व - अबु आझमी (समाजवादी पक्ष) १३८ - कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर (मनसे)१३९ - मुरबाड - किसन काठोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४० - अंबरनाथ (अनुसूचित जाती) - डॉ. बालाजी कीणीकर (शिवसेना)१४१ - उल्हासनगर - उत्तमचंद कुमार (भाजप)१४२ - कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)१४३ - डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)१४४ - कल्याण ग्रामीण - रमेश पाटील (मनसे)१४५ - मिरा भाईंदर - गिल्बर्ट मेंडोका (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४६ - ओव्हळा माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)१४७ - कोपरी पंचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)१४८ - ठाणे - राजन विचारे (शिवसेना)१४९ - मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५० - ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५१ - बेलापूर - गणेश नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)मुंबई उपनगर -१५२ - बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)१५३ - दहिसर - विनोद घोसाळकर (शिवसेना)१५४ - मागठाणे - प्रवीण दरेकर (मनसे)१५५ - मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)१५६ - विक्रोळी - मंगेश सांगळे (मनसे) १५७ - भांडुप पश्चिम - शिशिर शिंदे (मनसे)१५८ - जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वाईकर (शिवसेना)१५९ - दिंडोशी - राजहंस सिंग (कॉंग्रेस)१६० - कांदिवली पूर्व - रमेश ठाकूर (कॉंग्रेस)१६१ - चारकोप - योगेश सागर (भाजप)१६२ - मालाड पश्चिम - अस्लम शेख (कॉंग्रेस)१६३ - गोरेगाव - सुभाष देसाई (शिवसेना)१६४ - वर्सोवा - बाळदेव खोसा (कॉंग्रेस)१६५ - अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (कॉंग्रेस) १६६ - अंधेरी पूर्व - सुरेश शेट्टी (कॉंग्रेस)१६७ - विलेपार्ले - कृष्णा हेडगे (कॉंग्रेस)१६८ - चांदिवली - खान मोहम्मद आरीफ (कॉंग्रेस)१६९ - घाटकोपर पश्चिम - राम कदम (मनसे)१७० - घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)१७१ - मानखुर्द - अबू आझमी (समाजवादी पक्ष)१७२ - अणुशक्तीनगर - नवाब मलीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १७३ - चेंबूर - चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)१७४ - कुर्ला - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१७५ - कलिना - कृपाशंकर सिंग (कॉंग्रेस)१७६ - बांद्रा पूर्व - प्रकाश सावंत (शिवसेना)१७७ - ब्रा पश्चिम - बाबा सिद्दीकी (कॉंग्रेस)मुंबई शहर -१७८ - धारावी (अनुसूचित जमाती) - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)१७९ - सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी (कॉंग्रेस)१८० - वडाळा - कालीदास कोळंबकर (कॉंग्रेस)१८१ - माहिम - नितीन सरदेसाई (मनसे)१८२ - वरळी - सचिन अहीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८३ - शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे)१८४ - भायखळा - मधुकर चव्हाण (कॉंग्रेस)१८५ - मालबा हिल - मंगल लोढा (भाजप)१८६ - मुंबादेवी - अमीन पटेल (कॉंग्रेस)१८७ - कुलाबा - अनी शेखर (कॉंग्रेस)रायगड -१८८ - पनवेल - प्रशांत ठाकूर (कॉंग्रेस) १८९ - कर्जत - सुरेशभाऊ ला (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९० - उरण - विवेकानंद पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९१ - पेण - धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९२ - अलिबाग - मिनाक्षी पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९३ - श्रीवर्धन - सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९४ - महाड - भरतशेठ गोगावले (शिवसेना)पुणे -१९५ - जुन्नर - वल्लभ बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९६ - आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९७ - खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९८ - शिरूर - अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९९ - दौंड - रमेश थोरात (अपक्ष)२०० - इंदापूर - हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)२०१ - बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०२ - पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)२०३ - भोर - संग्राम थोपटे (कॉंग्रेस)२०४ - मावळ - बाळा भेगडे (भाजप) २०५ - चिंचवड - लक्ष्मण जगताप (अपक्ष)२०६ - पंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२०७ - भोसरी - विलास लांडे (अपक्ष)२०८ - वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०९ - शिवाजीनगर - विनायक निम्हण (कॉंग्रेस) २१० - कोथरूड - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)२११ - खकवासला - रमेश वांजळे (मनसे)२१२ - पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) २१३ - हडपसर - महादेव बाबर (शिवसेना)२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे (कॉंग्रेस)२१५ - कसबा पेठ - गिरीश बापट (भाजप)अहमदनगर -२१६ - अकोले (अनुसूचित जमाती) - मधुकर पिचड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२१७ - संगमनेर - बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस)२१८ - शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस)२१९ - कोपरगाव - अशोक काळे (शिवसेना)२२० - श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस)२२१ - नेवासा - शंकरराव गडाख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२२ - शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २२३ - राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप)२२४ - पारनेर - विजय औटी (शिवसेना)२२५ - अहमदनगर शहर - अनिल राठोड (शिवसेना)२२६ - श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२७ - कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे (भाजप)बीड -२२८ - गेवराई - बदामराव पंडीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२९ - माजलगाव - प्रकाशदादा सोळंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३० - बीड - जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २३१ - अष्टी - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३२ - केज (अनुसूचित जाती) - डॉ. विमलताई मुंदडा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३३ - परळी - पंकजा मुंडे-पालवे (भाजप)लातूर - २३४ - लातूर ग्रामीण - वैजनाथ शिंदे (कॉंग्रेस)२३५ - लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)२३६ - अहमदपूर - बाबासाहेब पाटील (रिडालोस)२३७ - उदगीर (अनुसूचित जाती) - सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३८ - निलंगा - शिवाजीराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस)२३९ - औसा - बसवराज पाटील (कॉंग्रेस)२४० - उमरगा - ध्यानराज चौगुले (शिवसेना)उस्मानाबाद -२४१ - तुळजापूर - मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)२४२ - उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)२४३ - परांडा - राहुल मोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सोलापूर - २४४ - करमाळा - शामल बागल (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४५ - माढा - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४६ - बार्शी - दिलीप सोपल (अपक्ष)२४७ - मोहोळ (अनुसूचित जाती) - लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२४८ - सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)२४९ - सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)२५० - अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील (भाजप) २५१ - सोलापूर दक्षिण - दिलीप माने (कॉंग्रेस)२५२ - पंढरपूर - तुकाराम भालके (स्वाभिमानी पक्ष)२५३ - सांगोला - गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष)२५४ - माळशिरस (अनुसूचित जाती) - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सातारा - २५५ - फलटण (अनुसूचित जाती) - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५६ - वाई - मकरंद जाधव पाटील (अपक्ष)२५७ - कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५८ - माण - जयकुमार गोरे (अपक्ष)२५९ - कराड उत्तर - शामराव पाटील (अपक्ष) २६० - कराड दक्षिण - विलासराव पाटील (कॉंग्रेस)२६१ - पाटण - विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६२ - सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)रत्नागिरी - २६३ - दापोली - सूर्यकांत दळवी (शिवसेना)२६४ - गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६५ - चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)२६६ - रत्नागिरी - उदय सामंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६७ - राजापूर - राजन साळवी (शिवसेना)सिंधुदुर्ग -२६८ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)२६९ - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस)२७० - सावंतवाडी - दिपक केसरकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)कोल्हापूर -२७१ - चंदगड - बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७२ - राधानगरी - के. पी. पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७३ - कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७४ - कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील (कॉंग्रेस)२७५ - करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)२७६ - कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)२७७ - शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पार्टी)२७८ - हातकणंगले (अनुसूचित जाती) - डॉ. सुजीक मिनचेकर (शिवसेना)२७९ - इचलकरंजी - सुरेश हाळवणकर (भाजप) २८० - शिरोळ - सा. रे. पाटील (कॉंग्रेस)सांगली -२८१ - मिरज (अनुसूचित जाती) - सुरेश खाडे (भाजप)२८२ - सांगली - संभाजी पवार (भाजप)२८३ - इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २८४ - शिराळा - मानसिंग नाईक (अपक्ष)२८५ - पलूस कडेगाव - पतंगराव कदम (कॉंग्रेस)२८६ - खानापूर - सदाशिवराव पाटील (कॉंग्रेस)२८७ - तासगाव कवठेमहांकाळ - आर आर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२८८ - जत - प्रकाश शेंडगे (भाजप)
Subscribe to:
Posts (Atom)
