Thursday, February 4, 2010

हमारी generation की आवाज सुनो !



स्वतःच्या हव्या तशा आयुष्याच्या मांडणीचा विचार करणारी, त्यासाठी पालकांची मदत घेणारी ही एक महाविद्यालयीन युवती... प्रातिनिधिक स्वरूपात ती पालकांना काहीतरी सांगू पाहतेय. आजच्या युवा पिढीचे भावविश्‍व शब्दबद्ध करण्याचा तिचा हा एक प्रयत्न स्वानुभवांसह, तिच्याच शब्दांत...!विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा Society, Elders, Parents हे विषय निघतात, तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या आई-वडिलांचा एक कॉमन व famous dialog सांगतात, "जास्त हुशारी करू नकोस. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे, पावसाळे बघितलेत!''पालकांना हे तरी माहीत आहे का की, त्यांच्या वेळचे उन्हाळे, पावसाळे व आताचे उन्हाळे, पावसाळे यामध्ये किती तफावत आहे? त्यांना सांगावंसं वाटतं, की तुमचा हा डायलॉग त्या काळासाठी योग्य असेल; पण आता उन्हाळे, पावसाळे तरी जागेवर राहिले आहेत का ? तुमचा उन्हाळा, पावसाळा व आमचा उन्हाळा, पावसाळा यात कम्पॅरिझन होऊच शकत नाही; कारण या दोन पिढ्यांमध्ये जो काळ आहे, त्यामध्ये झालेले changes उदाहरणार्थ © science, technology व Globalisation हे काळापेक्षाही जास्त speed ने पुढे गेले आहेत. त्यामुळे आमच्या पिढीचे विचार तुमच्याशी जुळू शकत नाहीत....म्हणे 'स्वंयपूर्ण' व्हा !मोबाईल व इंटरनेटवर नेहमीच त्यांचा राग असतो; पण आजची परिस्थिती अशी आहे, की एक वेळ जेवायला नसले तरी चालू शकते; पण या साऱ्या गोष्टी जीवनावश्‍यकच झाल्या आहेत. आम्ही मानतो, की काही जण त्याचा अतिरेक करतात, ऍडिक्‍ट होतात; पण जे त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग करतात, त्यांच्यासाठी ते देवासारखे आहेत. खरं तर मोठ्यांनी आमच्याकडून या गोष्टी कशा वापरायच्या, हे शिकले तर बरे होईल. नेमकी कॉलेजला निघायची वेळ किंवा टीव्हीवर आपल्या आवडीचे काही बघत असतो, तेव्हा त्यांना दुसऱ्यांना sms करण्याची आठवण येते. स्वतःला sms करता येत नाही, याचा राग ते आमच्यावर काढतात. रूटीन कामे सांगावीत तसे, एवढा sms करून दे आणि तेही रुबाबात सांगतात. घराबाहेर गेल्यावर मोबाईलमध्ये काही अडचण निर्माण झाली, तर त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. स्वतःचा अडाणीपणा ते दुसऱ्यासमोर दाखवतात. विशेष म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही आणि आपल्याला मात्र म्हणतात, "काय थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत लागते. आता मोठे झालात. स्वयंपूर्ण व्हा! हे कितपत स्वयंपूर्ण आहेत ते त्यांनाच माहीत!'काही पालक मात्र फार मोठ्या मनाचे असतात. आपले अज्ञान जाणून घेऊन आपल्याच मुलांकडून ज्ञान update करतात. त्याबद्दल काही माध्यम वापरून सर्वांना जागे करतात. मागच्याच महिन्यात 'सकाळ'मध्ये संपादक उत्तम कांबळेंचा 'मोबाईल हरवला व मोबाईल सापडला' वाचले. आम्हा सर्वांना वाचून फार आनंद झाला. वाटलं असंच सर्व पालकांनी मुलांकडून काय शिकण्यासारखं आहे ते जगजाहीरपणे कबूल केलं, तर बाकी पालकांवर त्याचा निश्‍चितच परिणाम होऊ शकतो. आमची अशा फालतू कामांपासून सुटका होऊ शकते. लुडबूड नकोय आम्हाला...!होस्टेलवर राहणारे कसेबसे पालकांच्या तडाख्यातून सुटून दुसऱ्या गावात येतात, तेव्हाही "पालकजात' पिच्छा सोडत नाही. सतरांदा फोन करतील. "आज काय केलं बेटा?' हा तर आईचा नेहमीचा प्रश्‍न असतो. त्यामुळे त्यांना रोजचं रूटीन "त्यांना जसं आवडतं,' तसं सांगून मोकळं होतो आम्ही; कारण रात्री मित्रांशीही फोनवर गप्पा करायच्या असतात. दुसरीही काही कामे असतात त्याबद्दल यांना सांगितलं, तर आहे तिथून लुडबूड करायला कमी करत नाहीत.होस्टेलवर राहणाऱ्या मुलींचं तर विचारूच नका. ती जिथे जिथे जाते तिथे तिथे तिची आई फोनने पिच्छा करत असते. हेही कमी की काय, 'पेरेंट्‌स मीटिंग'च्या वेळी जर यांचे प्रश्‍न ऐकले की असं वाटतं, अरे, आम्हाला काय तुम्ही अजूनही school going students समजता का? आम्ही कॉलेजमध्ये आलो. मोठे झालो हे त्यांच्या डोक्‍यातच जात नाही. असे बाळबोध प्रश्‍न विचारतात, की त्यांच्या प्रश्‍नांची कीव करावीशी वाटते. 'सातच्या आत घरात' विसरा आता ! मला चांगलं आठवतं, आमच्या प्राचार्यांना एका पालकांनी प्रश्‍न केला, की सर, तुमच्या कॉलेजच्या होस्टेलवर रात्रीचे लहशलज्ञ ळप 10.30 ला आहे. म्हणजे तुम्ही रात्री 10.30 पर्यंत मुलींना भटकू देता. एवढेच नाही, तर काही मुली 10 वाजता बाहेर जातात व 10.30 ला होस्टेलवर येतात, हे योग्य आहे का? मला वाटतं अजूनही बरेचसे पालक "मुलींनी सातच्या आत घरात' या डायलॉगमधून बाहेरच निघालेले नाहीत. ते o situation चा विचार न करता प्राचार्यांसमोर मुलींवरचे प्रेम उतू घालतात. त्यांना हे कळत नाही Eng, Med. व इतर कॉलेजेस संध्याकाळी पाच ते सहापर्यंत असतात. त्यानंतर ती मुले कॉम्प्युटरचे क्‍लासेस किंवा अवघड विषयांच्या ट्यूशनला जातात. मग नऊ वाजेपर्यंत क्‍लास झाल्यावर जेवण करून रूमवर यायला 10.30 नक्कीच होणार. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येण्या-जाण्यामध्ये किती वेळ जातो, याचा ते विचारच करत नाहीत. मुले जर कॉलेजच्या मेसवर जेवत असतील, तर असा आव आणत प्राचार्यांना बोलतात, की तुमची जेवणाची क्वालिटी बेक्कार आहे. तुम्ही मेनूमध्ये असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. रोजच ही कुणाची तरी तक्रार असणार; कारण मेसमध्ये जेवणारी मुले सर्व states मधून आलेली असतात. त्यामुळे काहीही मेनू ठेवला तरी तो कोणाला न कोणाला आवडणार नाही आणि होस्टेलला यायच्या आधी जेवणाच्या बाबतीत यांनी आमच्यासाठी काय बोंब मारलेली असते न सांगितलेले बरे!'खोके बढाउंगा...उडाउंगा भी !'एका रविवारी आमचा ग्रुप picture नंतर मॅकडीमध्ये गेला. मनसोक्त गप्पागोष्टी रंगल्या होत्या. विषय काय असणार? सध्याचा गाजणारा म्हणजे विद्यार्थी आत्महत्या. एक जण म्हणाला, "काय यार हे काय आत्महत्येचं वारं आलंय. स्वाइन फ्लू एकाला झाला की दुसऱ्याला होतो माहीत होतं; पण सध्या तर, आज पाच आत्महत्या झाल्या, तर दुसऱ्या दिवशी त्याची संख्या 10 वर... सालं झालं तरी काय विद्यार्थ्यांना! असं वाटतं आपणही करून पाहावी की काय? पण ही करण्यासारखी गोष्ट असली तरी करून पाहण्यासाठी... अरे बापरे! या विचारानेच घाम फुटतो.''एक जण म्हणतो, "माझीही परिस्थिती अशीच आहे. सालं माझ्या जागेवर दुसरे कुणी असते, तर तो केव्हाच वर ट्रान्स्फर झाला असता. माझा बाप मोठ्ठा डॉक्‍टर त्यामुळे मी डॉक्‍टर झालोच पाहिजे, नाही तर त्यांची गादी कोण चालवणार? यार हे पेरेंट्‌स बापाने किराणा दुकान मुलाच्या ताब्यात द्यावे, अशाच प्रकारे गोष्टी करतात...''"मालूम है उसने मेरी ऍडमिशन के लिए आधा खोका दिया, लेकिन मेरे उपर के खोके में कुछ जाने को मांगता ना! तीन साल से गाडी आगेही नही जा रही, बोलता है चिंता मत कर! और आधा खोका लगाऊंगा। खुदको बहुत smart समझता है।''"अरे वो सब ठीक है लेकिन तू हमे एक बता। उपरका खोका तो हमारी समझ में आया, याने की तेरी खोपडी। लेकिन पहलेवाले ऍडमिशनवाले आधे खोके क्‍या है, हमारे भी खोपडी में डाल।''"अरे तुम सब बुद्दू हो...एक खोका याने एक करोड। करोड को ये बिझनेसवाले खोका कहते है।''"बापरे... आधा खोका याने की पच्चास लाख। तेरे बाप ने इधर भरा।''"अरे इस में कुछ बडी बात नही। उस के पास बहुत खोके पडे हुए है। और आप सबको तो पताही है, की मुझे ये डाक्‍टर लाइन बिलकूल पसंद नहीहै । मैं इंजिनिअर होना मांगता था लेकिन...'' "उसे मालूम नही जब मैं उनकी गद्दी पे बैठूंगा तो खोके बढाऊंगा लेकिन जीते-जागते खोके उडाउंगा।''म्हटलं, आम्हालाही पडतात प्रश्‍न !मी नाशिकची... आई-वडील शिक्षण क्षेत्रात असल्याने लहानपणापासून अकरावी-बारावीचे स्टुडंट्‌स बघते. पालक बघते. आता हे सर्व वरचं ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एक डॉक्‍टर मॅडम. एकदा त्या आमच्याकडे आल्या. माझ्या पप्पांना म्हणाल्या, "सर, दोन महिन्यांवर परीक्षा आली आहे. माझी सोनाली बारावीत आहे. तिला जरा केमेस्ट्रीची मदत कराल काय?''दुसऱ्या दिवसापासून सोनाली संध्याकाळी सात ते रात्री नऊ आमच्याकडे. मॅडम स्वतः तिच्यासोबत यायच्या. खाली दोन तास गाडीत बसून राहायच्या. तिला सोबत घरी घेऊन जायच्या. प्रॅक्‍टिस सोडून दोन महिने दवाखाना बंद ठेवला. आईचं मुलीविषयीचं स्वप्न पूर्ण झालं. सोनाली मेडिकलला गेली. मोठा मुलगाही डॉक्‍टर झाला. त्यामुळे आई खूश; पण वडिलांना वाटायचं लहान्याने माझ्यासारखं डॉक्‍टर व्हावं. लहाना पठ्ठा फार हुशार निघाला! बारावीचा रिझल्ट लागेपर्यंत कळूच दिलं नाही, की त्याने अकरावीतच इळे. सोडलं आहे. रिझल्टनंतर आई-वडिलांना धक्काच. त्यानं ठरवलं होतं की डॉक्‍टर व्हायचं नाही. आई-वडील रिझल्टनंतर थोडा वेळ नाराज झाले. सर्व विसरून त्याच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या मागे लागले. चांगल्या ठिकाणी ऍडमिशन झाली. मागच्याच महिन्यात त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला पुण्याला मम्मीबरोबर गेले तेव्हा कळलं, की मोठा मुलगा नाशिकमध्ये व सोनाली व छोटा मुलगा मोठ्या पोस्टवर फॉरेनमध्ये... भूतकाळात गेले... सोनालीला आईने त्या वेळी साथ दिली नसती तर... छोट्यावरचा राग लगेच विसरून पालक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर... स्वतःची प्रॅक्‍टिस काही महिने बंद ठेवली नसती तर... हे असे अनेक प्रश्‍न...'असे आई-वडील आम्हालाही असते तर...? 'आधी दिलेल्या उदाहरणात त्या आई-वडिलांसारखं पैशाच्या जोरावर मुलाला डॉक्‍टर बनवणं व आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून मुलांना मानसिकरीत्या सांभाळून प्रोत्साहन देणारे आई-वडील दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये फार मोठी तफावत. पहिल्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला घातक, तर दुसऱ्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला आवश्‍यक.डॉ. उमेश कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी... पप्पांना मणक्‍यांचा त्रास म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर भेट व्हायची... एकदा सहज विचारलं, ""डॉक्‍टरसाहेब, मॅडम दिसत नाहीत?''ते म्हणाले, ""आमच्या मुलीला खेळाची आवड. त्यामुळे ज्या वेळी बाहेरगावी तिच्या टूर्नामेंट्‌स असतात, तेव्हा आळीपाळीने आमच्यापैकी एक जण तिच्याबरोबर जातो...'' विश्‍वासच बसला नाही.12 जानेवारीला "सकाळ'चे संपादक उत्तम कांबळे यांनी "तुमच्याही मुलांच्या मनात आहे एक कविता,' हे शीर्षक असणारी न्यूज फ्रंट पेजवर छापली. सकाळी सहाला मम्मीचा मोबाईल वाजला. दुसरीकडून अनोळखी व्यक्ती माझ्या आईला congratulation देत होत्या. आईला व मला कळलं, की आमच्या कुटुंबावर फ्रंट पेजवर बातमी आहे. तीन ते चार दिवस मम्मीचा मोबाईल फुल एंगेज. एक कॉल सुरू असताना पाच-सहा कॉल्स वेटिंगवर... मला कळेना एवढे फोन कसे येताहेत? तेव्हा लक्षात आलं न्यूजमध्ये मम्मी-पप्पांचे मोबाईल नंबर दिले आहेत. न्यूज येईपर्यंत आम्हा कोणालाच वाटले नव्हते, की आम्ही काही वेगळं केलं आहे. परंतु जेव्हा एसएमएस वाचायला सुरवात केली, तेव्हा प्रत्येक मेसेजमध्ये मम्मी-पप्पांना
congratulation त्याचबरोबर माझ्यासाठी खूप सारे good wishes. मी मम्मीला विचारले, "हे काय?'तेव्हा मम्मी म्हणाली, "बेटा, मला जे फोन आले त्यामध्ये जे स्टुडंट होते त्याचं म्हणणं होतं, "मॅडम, आम्हालाही असे आई-वडील असते तर... किंवा मॅडम please माझ्या आईशी... माझ्या वडिलांशी बोलाल का?' अशा प्रकारच्या फोननी तर माझ्या आईची झोपच उडाली. लक्षात आलं, की कित्येक आई-वडील मुलांना समजून घेत नाहीत... नको तेवढी बंधनं टाकतात... आम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, आता तू तरी पूर्ण कर... म्हणजे स्वतःचे स्वप्न मुलांकडून पूर्ण होण्याची अपेक्षा करतात... काही म्हणाले, "मॅडम, मला संगीताची आवड आहे, तर कुणाला ड्रॉइंगची, तर कुणाला खेळण्याची...' पण बहुतेक पालकांचं एकच म्हणणं, "पहिलं अभ्यासात लक्ष घाल. पूर्ण आयुष्य पडलं आहे छंद जोपासायला; पण माझ्या मम्मीला वाटतं शिक्षणाबरोबर जर छंद जोपासू दिले तर stress level कमी होऊ शकते; पण हे पालकांना पटविणे म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे असे आहे. यामुळे माझ्या पेरेंट्‌सनी सर्वांच्या फोनला प्रतिसाद दिला. "तुमच्या मुलांच्या पाठीशी उभे राहा,' असे सांगितले. तुम्ही केलेल्या संस्कारांवर तरी ठेवा विश्‍वास !सध्या पेपर उघडला की हमखास विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर बातमी असते. विद्यार्थ्यांची stress level वाढली हे खरं आहे; पण त्यांना त्यांच्याच घरात समजून घेणाऱ्या प्रेमाच्या व्यक्ती लाभल्या तर...? ते frustration adiction च्या मागे लागतात. वाईट सवयी लावून घेतात व जिथे या गोष्टी म्हणजे stress level अतिशय वाढते, तेव्हा आयुष्याचा शेवट एवढाच पर्याय त्यांना दिसतो. नेहमी "फोनवर एवढा वेळ बोलते', असं मम्मीला म्हणणारी मी या घटनेनंतर तिचं बोलणं किती गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं. अशा कित्येक आया आहेत त्या योग्य वेळी स्वतःच्या मुलांचं करिअर स्वतःच्या करिअरपेक्षा आवश्‍यक समजतात.
मला शाळेचे दिवस आठवतात. सातवी-आठवीमध्ये मुली आल्या, की पेरेंट्‌सला वेगळीच काळजी असते. नको तेवढ्या चौकशा... थोडासा उशीर झाला तरी शंभर प्रश्‍न, "आता तू मोठी झालीस. असं नको करू. तसं नको करू. असे कपडे घाल, तसे कपडे घाल, घरात कामाला मदत कर, मुलीची जात आहे. तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे...' आणि रिस्ट्रिक्‍शन्स..माझ्या एका मैत्रिणीची आई मुलीवर सतत ऑर्डर सोडते. तिला एखादी गोष्ट करणे शक्‍य नसेल, तर कुठलाही प्रश्‍न विचारण्याचा तिला अधिकार नाही. आम्ही मैत्रिणीला एकदा विचारले, "का गं, आम्ही सर्व सायकलीवरून येतो, तू का नाही सायकलीवरून येत?' ती म्हणाली, "माझे आई-बाबा म्हणतात, सायकल चालवायची नाही; कारण त्याने उंची वाढते व उंची जर जास्त वाढली, तर तुझ्यासाठी मुलगा कुठून आणायचा?'शक्‍यतोवर आम्ही रात्री 10.30 ते 11.30 लॅपटॉपवर बसतो. इंटरनेटवर बसतो; कारण त्याच वेळी मित्र-मैत्रिणी भेटू शकतात. काही जण याचा गैरवापर करतात म्हणून प्रत्येकच जण गैरवापर करेल असे नाही. कधी कधी इनबॉक्‍स चेक करतात. त्यावरचे जे रिप्लाय असतात, त्याचा खरा मीनिंगच त्यांना माहीत नसतो किंवा तो कुठल्या मेसेजवर रिप्लाय आहे हेही माहीत नसतं. उगीचच निगेटिव्ह मीनिंग काढतात. आम्ही जास्त एसएमएस करतो; कारण ते आम्हाला स्वस्त वाटतात. उदाहरणार्थ मैत्रिणीला विचारायचं आहे "तू कुठं आहेस?' असे करण्यासाठी कॉलला एक रुपया; पण एसएमएसला एक पैसाच लागतो. त्यामुळे आम्ही एसएमएसचा भरपूर वापर करतो. तर यांना वाटतं काही तरी लफडंच आहे ! यांचा थोड्या थोड्या गोष्टींवर अविश्‍वास.शेवटी म्हणावं लागतं, ""अरे बाबा... तुम्हीच तर आमच्यावर संस्कार केले आहेत, त्यावरही तुमचा विश्‍वास नाही का?''बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की आई-वडील मुलांशी नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुड रिलेशनशिप तयार होत नाही. अशा वेळी मुलं आपलं मन मोकळं करू शकत नाहीत. जर त्यांचे मित्रही असे असतील, की त्यांच्याजवळ ते बोलू शकत नाहीत. त्या वेळी असं वाटतं, की भावना मोकळ्या करायला आई एवढं जवळ कोणीच असू शकत नाही. ज्यांना घरातच भावनिक संरक्षण मिळतं, ते वाईट मार्गाला लागत नाहीत....बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? माझी मैत्रीण जी आदर स्टेटची आहे, ती एक दिवस चक्कर येऊन पडली. स्ट्रेसमुळे. दुसऱ्या स्टेटची असल्यामुळे आई-वडील लगेचच पोचू शकत नव्हते. माझ्या आईने तिला दवाखान्यात नेऊन दिवसभर भरती केले. रात्री घरी आणले.ती मैत्रीण डॉक्‍टरांना म्हणायची, "मुझे पप्पा से बात करनी है।' परंतु तिचे वडील ऑपरेशनमध्ये एंगेज असल्यामुळे बोलू शकत नव्हते. रात्री फोन केला त्यांना. सर्व घटना सांगितली. मी त्यांना विचारले, "अंकल, आप कब निकल रहे हो?' तेव्हा ते म्हणाले, "मुझे तीन-चार दिन मेजर ऑपरेशन्स है इसलिए नही आ सकता। ऐसा करो उसे बोलो दो दिन रेस्ट कर के प्लेन से चली आना।' मी तिच्या बाजूलाच बसले होते. माझं डोकं सुन्न झालं. तिच्या पप्पांना बाकी पेशंटसमोर स्वतःची मुलगी काहीच वाटत नसेल. कदाचित बाकी पेशंटचे ऑपरेशन दुसरे डॉक्‍टर करू शकतील; पण पप्पा म्हणून जर ते आले असते... नात्यातल्या दुसऱ्या कुणाला पाठवू शकले असते... असे डॉक्‍टर खोऱ्यांनी पैसे कमावतात; पण बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? कदाचित पप्पांमुळेच ती परमनंट पेशंट बनेल.

अश्‍विनी जोगी, नाशिक

No comments:

Post a Comment